*शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे जल जागरण कार्यक्रम संपन्न* .....

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात दी. 30, जानेवारी रोजी जल जागरण संपन्न झाला, या कार्यक्रमात युवकांना जलसंवर्धनाचे महत्त्व, पाण्याचे विविध स्रोत, जग पातळीवरचे विविध शोध इत्यादी विषय वक्तांकडून युवकांना सांगण्यात आले. जल मंत्रालय पाण्याच्या बाबतीत विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती चे काम करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून नेहरू युवा केंद्र संघटन धुळे, यांच्यामार्फत संपुर्ण धुळे जिल्ह्यामध्ये असे जनजागृतीचे काम नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत. नेहरू युवा केंद्राचे माजी समन्वयक जितेंद्र राठोड यांनी जिल्ह्याचे युवा अधिकारी अशोक कुमार मेगवाल यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घडवून आणला.
या कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे युवा मंडळाचे युवक उपस्थित होते. या कार्यक्रमात भाटपुरा येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक मंगल माळी सर, श्रावण चव्हाण, उपसरपंच रोशन सोनवणे, पत्रकार रणजित जाधव, उमेश पाटील, अनिकेत बोरसे, गौरव पावरा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कमलेश जाधव, जितेंद्र राठोड, गणेश चव्हाण, नंदू कोळी प्रमोद शिरसाट राहुल राठोड यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिरसाठ, कृष्णा जाधव यांनी केली. व कमलेश जाधव यांनी आभार व्यक्त केले. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा